February 21, 2026

अहिल्यानगर : मातंग समाजावर होत असलेला अन्याय, अपमान आणि अत्याचार याविरोधात आता मातंग समाज उभा ठाकला आहे.

समाजातील आत्मसन्मानाचा ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी आणि आपल्या अस्तित्वावर होत असलेल्या वारांना उत्तर देण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर शहरात एक विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. लालटाकी येथील वीर लहुजी चौकात हा मोर्चा संपन्न होणार असून या मोर्चाद्वारे अन्यायाचा तीव्र निषेध व्यक्त केला जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, “ज्यांच्या मनात मातंग समाजाबद्दल प्रेम आहे, समाजाच्या वेदनेची तळमळ आहे. त्यांनी १० नोव्हेंबरला उपस्थित राहावे. आज फक्त मातंग समाजच नव्हे, तर इतर अनेक समाजघटकांवरही अन्याय होत आहेत. म्हणून, ज्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा आहे, त्यांनीही या मोर्चात सहभागी व्हावे. हा संघर्ष समानतेसाठी आणि माणुसकीसाठी आहे.”

अहिल्यानगरचा हा मोर्चा समाजातील जागरूकतेचा आणि ऐक्याचा नवा संदेश देणारा ठरणार आहे. वीर लहुजी यांच्या स्मृतीस्थळी एकत्र येऊन अन्यायाला उत्तर देण्याची, स्वाभिमानाची ज्योत चेतवण्याची तयारी समाजाने केली आहे.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!