February 21, 2026

पाथर्डी : शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीने शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके वाहून गेली, जनावरे दगावली, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून शासनाने कुणावरही अन्याय न करता सर्वांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केली आहे.

काही वर्षांपूर्वी अशाच संकटाच्या वेळी वर्ग दोन व उताऱ्यावर पोटखराबा नोंदी असलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, असेही प्रा. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष योगेश साठे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, अमोल मिरपगार, योगेश गुंजाळ, नागेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शियर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!